प्रेमाची उतरंड

प्रेमाची उतरंड -संपदा म्हाळगी-आडकर १०/८/१०
 
माणूस प्रेम करतो. कोणावर करतो? स्वत:वर… आजूबाजूच्या व्यक्तिंवर (आई वडील, जिवलग.. इ.) …. पाळीव प्राण्यांवर… घरावर… घरातल्या वस्तूंवर… टीव्हीवर.. इतकंच काय टीव्हीतल्या काल्पनिक व्यक्तिरेखांवर सुद्धा! कोणी म्हणेल देशावर.. देशबांधवांवर… मातृभूमीवर.. चला एकवेळ मान्य करू.  पण ह्या प्रेमाची उतरंड कोणी कशी रचलीय? बहुतेक वेळा वर नमूद केलेले प्रेमाचे प्रकार एकावर एक ठेवलेले असतात. म्हणजे सगळ्यात खाली स्वत: वरचं प्रेम, मग त्यावर आजूबाजूच्या व्यक्तिंवरचं…. प्राण्यांवरचं… सो ऑन. (टीप: स्वत:वरचं प्रेम गौण समजून बाकीच्या प्रेमाला प्राधान्य देणं अशातला ह्या उतरंडीचा अर्थ लावू नका. पुढे वाचा!)
उतरंडीत सगळ्यात खाली असलेला घडा सगळ्या वरच्या घड्यांचा भार सहन करत असतो. (लग्नात मुली पूजतात तो गौरीहर imagine करा) ‘आपण बाकी प्रेमांपुढे आपलं स्वत:वरचं प्रेम दाबून टाकतो’ अश्यातलं काही नाही. खरं पाहता तो खालचा घडा सगळ्यात सेफ(सुरक्षित) असतो. उतरंडीला धक्का लागला तर सगळ्यात आधी वरचे घडे खाली येतात… सर्वात उंचावरून खाली आढळतात आणि फुटतात. म्हणजे देशप्रेम… राष्ट्रप्रेम… सगळ्याचा फुटून चक्काचूर सगळ्यांत पहिल्यादा होतो.
“जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” असं राम सांगून गेला, पण उपयोग काय? रामच्या नावावर आज राजकारण झालं. आपल्याला मिळालेल्या पाठिंब्याच्या जोरावर “रामराज्य” आणायचं सोडून, नेत्यांनी राज्य केलं… धर्माचं राजकारण केलं.. स्वत: स्वर्गसुख उपभोगलं पण लोकांना देशोधडीला लावलं. स्वहित लोकहिताच्या पुढे ठेवलं. मग त्यांचा स्वप्रेमाचा घडा सगळ्यात मोठा नाही का? अयोध्या प्रश्नी निकाल लागला पण राजकारण संपलं नाही. आता तिथे मंदिर/ मशीद बांधेपर्यंत किंवा बांधून झाल्यावरही हे भिजतं घोंगड तसंच राहील. हे काय करून गेला राम? लोकोद्धारासाठी अयोध्येमध्ये जन्म घेऊन, सोन्याची लंका नको म्हणणारा, स्वहितापुढे जनहित, देशप्रेम ठेवणारा रामसुद्धा मनुष्ययोनीच्या भोगांपासून सुटला नाही. रामाचं सोडा तो देवपण असलेला मनुष्य होता. आपलं काय?
देशावर हल्ले झाले. युद्धं झाली. सैनिक-लोकं मारली गेली. संसार उधवस्त झाले. ‘मनांवर कायमची खूण राहिली’ ह्या सगळ्या म्हणायच्या सांगायच्या गोष्टी! हल्ल्यांनी direct affect झालेली जनता सोडता, सर्व हल्ले/युद्धं विस्मरणात जातात. जवानांच्या शवपेट्यांचे गैर-व्यवहार होतात. gas एजन्सी आणि पेट्रोल पंपांसाठी राजकारण होतं. मिडियाचं सगळयात महत्वाचं काम प्रबोधनाचं!  पण तिथेही हल्ल्यांचा उपयोग कव्हरेज दाखवण्यासाठी होतो. channel ची TRP वाढवण्यासाठी होतो. टीव्ही अवार्ड्स मिळवण्यासाठी होतो.
‘बिग बॉस’ सारखे कार्यक्रम पाकिस्तानच्या लोकांना घेऊन येतात. पाकिस्तानी सर्वसामान्य लोकांबद्दल मला आकस नाही पण प्रेमही नाही. त्यांच्या देशाकडून आपल्याला एवढा धोका असताना, का आणायचं त्यांना इकडे? आणि मग हल्ला झाला कि घाई गडबडीने त्यांना परत पाठवून द्यायचं! मग त्याचा मोठा गाजावाजा करायचा! जेवढा मोठा गाजावाजा तेवढी TRP! आणि TRP वाढवतं कोण? आपल्यासारखे छाती ठोकून देशप्रेम सांगणारे लोक! हे सगळं कशाला? मनोरंजन आपल्या जागी, देशप्रेम आपल्या जागी नको का? “controversy/ negative publicity ने TRP वाढवणे”, हा सगळयात सोपा मार्ग नव्या मिडियाने का अवलंबला आहे? मग नाही का आपल्या (मिडियातले लोक आणि आपण प्रेक्षक) स्वप्रेमाचा घडा सगळयात मोठा आणि देशप्रेमाचा सगळयात लहान?
सीमेवर जाऊन लढण्याची ताकद आपल्यात नाही, तर सामाजिक लढे चालवू असंही नाही. सगळीकडेच शेपूटघाले आपण! पण नको बघूया ‘बिग बॉस’, घालू बहिष्कार! बघू जमतंय का? ठाकरे म्हणताहेत म्हणून नाही करायचं, एकदा स्वत:ला वाटतंय म्हणून तरी करूयात. चेंज हवा असेल तर तो initiate करायची तयारी (आणि जवाबदारी) पण नको का? प्रेमाची उतरंड आपलीच, मग ती आपणच बदलू का नाही शकत? घेऊया राष्ट्रप्रेमाचा घडा सगळयात खाली, ठेऊया त्याला सगळयात सेफ!

१ प्रतिक्रिया

Filed under अनुसूचित

One Response to प्रेमाची उतरंड

  1. सुरेश पेठे

    लेख खरंच छान झालाय . पण खरं सांगू आम्ही कशाचीच उतरंड लावित नाही . सगळाच मामला सपाट असतो आमचा !!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s